Monday 9 January 2012

मैत्रिणीच्या गच्च गराड्यात
स्वताहून कधी बोललीच नाहीस
ओळख वाढवायची इच्छाहि माझी प्रचंड
पण पूर्ण करायला आपण कधी भेटलोच नाही

प्रत्येक वेळी तिसरच कुणी तरी
मध्ये टपकत राहील ...
जवळ असून सुद्धा एकमेकांच्या
अंतर आपल्यातल कस वाढतच राहील ...
दूर जायला आपण कधी
एकमेकांन जवळ भटकलोच नाही
थोडक्यात कापन शक्य होत अंतर
पण मिटवायला आपण कधी भेटलोच नाही ...


दूर राहून हि प्रेम करण
आता तर सवयीचच झालंय ...
एकमेकांचे फक्त अंदाज बांधन
आता कस अंगवळणी पडलंय ...
माझ्या मनात प्रश्न देखील होते साधेच
पण उत्तरांसाठी आपण कधी भेटलोच नाही...


सहनशक्तिचा आता माझा अंत झालाय
भेटीच्या तुझ्या विचाराने जीव कसा व्याकुळ झालाय ...
सांगायचं आहे तुला मनातल बरंच काही
मनातल्या भावनांना टाकायचं तुझ्या कानी ...
हि एकाच अपेक्षा आता दड्लीय माझ्या उरी
पूर्ण करायला आपण भेटलंच पाहिजे, सगळ हाताबाहेर जान्या आधी ......


               _________ शैलेश



No comments:

Post a Comment